पंढरी वार्ता:- आमदार भारत भालके यांचा राजीनामा

आमदार भारत भालके यांचा राजीनामा 

मराठा,धनगर,कोळी महादेव व मुस्लिम समाजाच्या आरक्षणाबाबत सरकारवर डागली तोफ

पहा viedo 

मराठा समाज,धनगर समाज व मुस्लिम सामाजाच्या आरक्षणाच्या मागणीबाबत राज्य सरकार केवळ राजकारण करीत असून कोळी महादेव समाजासही याच भावनेने खोटी आश्‍वासने देवून सरकारकडून फसविण्यात येत आहे.केवळ राजकारण करण्याचाच सरकारचा हेतू असून अशातच महसूल मंत्री ना.चंद्रकांत पाटील हे सातत्याने मराठा समाजाच्या या आंदोलनाबाबत वादग्रस्त विधाने करीत असताना मुख्यमंत्री मात्र बोटचेपी भूमिका घेत  आहेत.सरकारच्या या धोरणामुळे मराठा समाज प्रचंड अस्वस्थ आहे.मराठा समाज,धनगर समाज रस्त्यावर उतरून आंदोलने करीत असतानाच या सरकारमधील काही मंत्री व आमदार या समाजांच्या आंदोलनाबाबत अतिशय वादग्रस्त वक्तव्य करीत आहेत.आरक्षणाच्या प्रश्‍नाबाबत सभागृहात अनेकवेळा आवाज उठवूनही हे सरकार दखल घेत नाही,रस्त्यावर उतरून आंदोलने करुनही दाद देत नाही,लाखोंच्या संख्येने शांततेत मुक मोर्चे निघाले तरीही केवळ खोटी आश्‍वासने देते.आता या सरकारच्या विरोधात प्रचंड असंतोष असताना आमदार म्हणून कार्यरत राहणे मला योग्य वाटत नाही म्हणून मी राजीनामा देत आहे अशी प्रतिक्रिया आ.भारत भालके यांनी आपला राजीनामा दिल्यानंतर व्यक्त केली आहे.
           धनगर समाजास अनुसुचीत जमातीचे आरक्षण केवळ एका शब्दामुळे अडले आहे तरीही हे सरकार काहगी ठोस निर्णय घेत नाही,मुस्लिम समाजास यापुर्वीच्या सरकारने पाच टक्के आरक्षण जाहीर केले होते.ते आरक्षण या सरकारने काढून घेतले,कोळी महादेव जमातीच्या बांधवांचा अनुसुचीत जमातीच्या दाखल्याचा प्रश्‍न विधानसभेत आवाज उठवूनही अनिर्णित ठेवला गेला त्यामुळे या फसव्या सरकारच्या  विरोधात आपण निषेध व्यक्त करीत राजीनामा देत आहोत अशी प्रतिक्रिया आ.भारत भालके यांनी दिली आहे. 

Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव