क्रांतीसिंह नाना पाटील चौक ते इसबावी रस्त्यावर एलईडी दिवे बसविण्याची मागणी 

अपुर्‍या प्रकाशामुळे अपघातास आमंत्रण

विद्यार्थ्यांच्या वर्दळीचा रस्ता असल्याने पालकवर्ग चिंतेत 


पंढरपूर नगरपरिषद संचलित लोकमान्य विद्यालयात स्वच्छतेची शपथ घेऊन पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यात आला. गणपती ची मिरवणूक ढोल,ताशा व विद्यार्थ्यांच्या लेझीम पथकाने करण्यात पंढरपूर शहरातील सरगम चौक ते इसबावी हा रस्ता प्रचंड वर्दळीचा रस्ता असल्याने अतिशय धोकादायक बनला असून या रस्त्यावर इसबावी या पंढरपूर शहराच्या सर्वात मोठ्या उपनगरातील अबालवृध्द नागरिक याच रस्त्याने पंढरपूर शहराच्या मुख्य गावठाण भागात ये-जा करतात.त्याच बरोबर पंढरपूर शहरात असलेल्या विविध महाविद्यालयात,शाळांमध्ये इसबावी परिसरातील हजारोच्या संख्येने विद्यार्थी ये-जा करतात.मात्र या रस्त्यावरच गेल्या काही वर्षात मोठया प्रमाणात अपघाताच्या घटना घडल्या आहेत.याच रस्त्याला समांतर असलेल्या तालुका पोलीस ठाणे ते प्रबोधनकार ठाकरे चौक या रस्त्यावर रस्ता दुभाजक बनवले जाते मात्र या रस्त्यावर रस्ता दुभाजक तयार करण्यात यावे या मागणीसाठी आतापर्यंत शहरातील अनेक संघटनांनी निवेदने देवून देखील त्याची दखल घेतली जात नाही.पंढरपूर शहर हद्दीत याच रस्त्यावर सर्वात जास्त अपघात होत असतानाही या रस्त्यावर अपघात होत नाहीत असे धक्कादायक विधान राज्याचे महसुलमंत्री ना.चंद्रकांत देशमुख यांनी केले होते.नुकताच या रस्त्यावर मलपे ओढा येथे पुन्हा अपघात घडला असून अज्ञात  वाहनाने धडक दिल्याने एका दुचाकी स्वाराचा मृत्यु झाला आहे.या अपघाताची घटना घडल्यानंतर इसबावी परिसरातील रहिवाशांमध्ये पुन्हा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.या रस्त्यावरुन रात्रीच्या वेळी शहरातील अनेक क्लासेसमध्ये शिकवणीसाठी अनेक विद्यार्थी येत असतात.या रस्त्यावर असलेल्या पथदिव्यांचा प्रकाश अतिशय अपुरा असून त्यामुळे या रस्त्यावर तातडीने एलईडी दिवे बसवविण्यात यावेत अशा अशायाचे निवेदन राष्ट्रवादी कॉग्रेस ओबीसी सेलच्या वतीने नगर पालीकेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट यांना देण्यात आले आहे.
     हे निवेदन देताना याप्रसंगी  अनिल सप्ताळ यांच्यासह मनोज  आदलिंगे,सुरज गुंड, रशीद शेख, माऊली पवार आदी उपस्थित होते.यावेळी पंढरी वार्ताशी बोलताना  अनिल सप्ताळ म्हणाले की,या रस्त्यावर वारंवार अपघात होतात.या रस्त्यावर दुभाजक करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याकडे आग्रह धरला जातो त्यावेळी हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या ताब्यात असल्याचे कारण सांगीतले गेले.हा रस्ता पंढरपूर शहरातील सर्वात जास्त धोकादायक व अपघात प्रवण रस्ता आहे.या रस्त्यावर प्रचंड वर्दळ असल्यामुळे आमच्या सारख्या पालक वर्गामध्ये प्रचंड भीतीचे वातावण आहे.या रस्त्यावर मलपे ओढा परिसरात तर अतिशय अंधुक प्रकाश देणारे रोड लाईट असल्याने अपघाताची शक्यता अतिशय बळावते.त्यामुळेच या रस्त्याच्या दुतर्फा जास्त प्रकाश देणारे एलईडी पथदिवे बसवावेत अशी मागणी आम्ही नगर पालीका प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.   

Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव