पंढरी वार्ता:- ग्रामसेवकांसाठी खुशखबर तर ग्रामस्थांची गळचेपी ! आता राष्ट्रीय सणादिवशी ग्रामसभेस परवानगी नाही. ग्रामपंचायतीने ठराव केल्यास ग्रामसभा याच दिवशी घेतली जावी - संजय पाटील घाटणेकर
राष्ट्रीय सणा दिवशी शासकिय सुटी असल्याने या दिवशी ग्रामसभा न घेण्याची राज्य ग्रामसेवक युनियनने केलेली मागणी राज्य शासनाने मान्य करीत यापुढे गावत या दिवशी ग्रामसभेचे आयोजन करण्यास प्रतिबंध करणारा निर्णय शासनाने घेतला आहे.राष्ट्रीय सणाच्या दिवशी ग्रामसभेत उपस्थित होत असलेल्या विविध वादांच्या विषयामुळे गावातील वातावण कलुषीत होत असल्याने शासनाने हा निर्णय घेतला आहे.त्यामुळे ग्रामसेवकांसाठी ही एक खुशखबर ठरली असली तरी शासनाचा हा निर्णय ग्रामस्थांच्या न्याय्य हक्कावर गदा आणणारा ठरला आहे. शासनाच्या या निर्णयाबाबत पंढरी वार्ताशी बोलताना बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संजय पाटील-घाटणेकर म्हणाले की,वास्तवीक पाहता राष्ट्रीय सणाच्या दिवशी अतिशय उत्साहाने ग्रामस्थ एकत्र येत असतात व गावच्या विकासाबाबत चर्चा करण्यासाठी उत्सुक असतात.या दिवशी आयोजीत ग्रामसभांमध्ये काहीवेळा वादाचे प्रसंग उदभवतात पण त्याचे प्रमणा अतिशय नगण्य आहे.आणि जर ए खाद्या गावात राजकीय वाद तिव्र असेल तर कुठल्याही दिवशी ग्रामसभा आयोजीत केली तरी वाद हा होत च असतो.मात्र ग्रामसभांकडे सकारात्क द्रष्टीने पा...