Posts

Showing posts from March, 2018

पंढरी वार्ता :-पंढरीतील गुंडगीरीवर आज कोण कोण बोलणार ? पोलीस महानिरिक्षक विश्‍वास नांगरे पाटील आज कोर्टी येथील‘सिंहगड’वर पंढरपूरकरांशी संवाद साधणार .

Image
गेल्या काही वर्षात पंढरपूर शहरात सुरु असलेले हत्यासत्र,येथील गुंडगीरी,अवैध सावकारीची दहशत,सर्वसामान्य जनतेमध्ये पोलीस आणि कायदा याबद्दल निर्माण झालेले अविश्‍वासाचे वातावरण,येथील गुंडांना मिळालेला राजकीय वरहस्त,वाळूचोरी,सावकारीच्या माध्यमातून मिळालेल्या अफाट संपत्तीच्या बळावर गल्लीतील कट्टयावर बसणार्‍या बेरोजगार तरुणांचा स्वत:च्या राजकीय वर्चस्वासाठी केला जाणार वापर आणि सर्वात म्हत्वाचे म्हणजे येथे एवढे सगळे घडत असताना पंढरपूरचे भाग्यविधाते म्हणवून घेणार्‍या येथील नेतेमंडळींनी बाळगलेले मौन यामुळे पंढरपूर शहरातील सर्वसामान्य जनतेमधील आत्मविश्‍वास हरवीला होता.कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरिक्षक विश्‍वास नांगरे पाटील यांनी गतवर्षी मार्च महिन्यातच येथील जनतेशी संवाद साधत पोलीस ठोस कारवाई करतील,गुंडाना मोका लावतील,स्थानबध्द करतील असे सांगत येथील जनतेध्ये पोलीसांबद्दल ‘विश्‍वास’ निर्माण केला होता.     गेल्या वर्षभरात घडलेल्या अनेक गंभीर गुन्ह्यात ना कुठल्या आरोपीवर मोका लावण्यात आला ना पोलीसांच्या कठोर कारवाईचा धोका ओळखून येथील गुंडगीरी,दहशत संपुष्टात आली.आज पुन्हा विश्‍वास न...

पंढरी वार्ता :- पुळूज बंधार्‍यावर ‘बळीराजाचा’ एल्गार ! 14 गावातील ग्रामस्थांना सोबत घेवून बंधार्‍यास दारे टाकण्याचा प्रयत्न

Image
ग्रामिण जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागत आहे.सद्या उजनीधरणातून भीमा नदीतून सोलापूर शहरासाठी पाणी सोडले आहे.मात्र त्याचवेळी नदीकाठच्या भागातील वीज पुरवठा खंडीत केला जात आहे.ग्रामिण जनतेचे होणारे हाल प्रशासनास दिसत नाहीत का ? भीमा नदीत सोडलेल्या  पाण्याने नदीवरील सर्वबंधारे पुर्ण क्षमतेने भरुन घेवून ग्रामिण जनतेचे हाल थांबवावेत या मागणीसाठी बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संजय पाटील घाटणेकर,जिल्हाध्यक्ष माऊली हळणवर,जिल्हा उपाध्यक्ष शहाजहान शेख,तालुकाध्यक्ष माऊली जवळेकर यांच्यासह संघटनेच्या कार्यकर्त्यांनी व परिसरातील 14 गावातील शेकडो ग्रामस्थांनी आज पुळूज बंधार्‍यास दारे टाकावीत यामागणीसाठी बंधार्‍यावर धरणे आंदोलन केले.यावेळी बळीराजाच्या कार्यकर्त्यांनी बंधार्‍यास दारे टाकण्याचा प्रयत्न केला.या आंदोनस्थळी भीमा पाटबंधारेचे कार्यकारी अभियंता श्री जगताप,तालुका पोलीस निरिक्षक कृष्णदेव खराडे उपस्थित होते.शेतकर्‍यांचे उग्र रुप पाहुन पुळुज बंधार्‍यास तीने दारे टाकण्याचे आदेश यावेळी जगताप यांनी दिले.      भीमा नदीच्या काठच्या शेतकर्‍यांना पिण्यासाठी...

पंढरी वार्ता :- पंढरीतील गायक निवेदक रफिक शेख यांचा पणजी येथे गोमंतरत्न पुरस्काराने गौरव

Image
आपल्या अलौकीक निवेदन शैली व गायनकलेसाठी प्रसिध्द असलेले पंढरपूरचे कलाकार रफिक शेख यांचा पणजी गोवा येथे आयोजीत अतुल्य भारत प्रतिभा कार्यक्रमाच्यानिमित्ताने कामगार नेते अजितसिंह राणे यांच्या हस्ते गोमंतक रत्न पुरस्कार देवून गौरव करण्यात आला आहे.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.बी.एन.खरात हे होते.      गेल्या दोन दशकापासून रफिक शेख यांनी पंढरीच्या कलाक्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.महाराष्ट्रासह इतर राज्यातही त्यांनी आपली गायनकला सादर केली आहे.तर प्रसिध्द गायक मोहमंद अय्याज यांच्या सोबत ते स्टेज शो साठी भारतभर भ्रमण करीत असतात.त्यांनी हिंदी चित्रपिट गीतगायक मोहंमद अझिज,साधना सरगम यांच्यासोबतही विविध कार्यक्रमात गायन केले आहे. त्यंाच्या कलेची दखल घेत त्यांचा पणजी येथे आयोजीत कार्यक्रमात हा पुरस्कार देवून गौरव करण्यात आला.या कार्यक्रमास समाजरत्न जी.बी.व्हसकोटी,उद्योगपती कौस्तुभ गायकवाड,डॉ.प्रशांत पाटील,जेष्ठ साहित्यीक समाजरत्न डॉ.शंकर शेट्टी,गोव्याचे मा. शिक्षण व आरोग्यमंत्री प्रमोद कामत,गोवा राज्य पुरस्कार विजेते पुंडलीक काटगुळकर,गोरख मांजरे,आंतराष्ट्रिय ख्यातीप...

पंढरी वार्ता :- शरद पवारांचा सल्ला अन् ‘विजय शुगर’ पुन्हा एकदा चर्चेत ! साखर पट्टयातील कारखाना चालविण्यातील अपयशाला कायदेशीर पळवाटचा आधार ?

Image
गेल्या काही वर्षात सोलापूर जिल्ह्यातील वाढते उसाचे क्षेत्र लक्षात घेवून खाजगी साखर कारखानदारी मोठया प्रमाणात वाढली असून एकेकाळी जिल्हयात सहकारी साखर कारखानदारीचे वर्चस्व होते.ज्याचे तालुक्यातील साखर कारखान्यावर वर्चस्व तो तालुक्याचा आमदार असेच जणू अलिखीत समिकरण अस्तित्वात आले होेते.मात्र ऊसाचे वाढते क्षेत्र त्याच बरोबर खाजगी साखर कारखान्याच्या उभारणी बाबतच्या नियमात मोठया प्रमाणात निर्माण झालेली शिथीलता याचा फायदा घेत जिल्ह्यात गेल्या दशकात मोठया प्रमाणात खाजगी साखर कारखाने अस्तित्वात आले.या पैकी अनेक कारखाने हे केवळ राजकीय वर्चस्वाच्या हव्यासापोटी उभारण्यात आल्याचे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे.मात्र तरीही सोलापूर जिल्ह्यात गेल्या आठ ते दहा वर्षाच्या कालावधीत उभारण्यात आलेल्या अनेक खाजगी साखर कारखान्याने प्रत्येक गळीत हंगाम यशस्वी रित्या पार पाडीत नफा -नुकसान सोसत यशस्वी वाटचाल केलेली असतानाच 2009 च्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाच्या निवडणूकीतील अपयशानंतर पंढरपूर तालुक्यावर राजकीय वर्चस्व प्राप्त करण्यासाठी अत्यावशक असलेल्या साखर कारखानदारीचा आधार घेण्याच्या हेतूनेच मोहीते-पाटील ...

पंढरी वार्ता :- पांडुरंग कोकाटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान. विविध उपक्रमात बजावलेल्या कामगीरीची दखल घेत पुरस्कारासाठी निवड.

Image
पंढरपूर पंचायत समितीच्या वतीने दिला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार सिध्देवाडी येथे कार्यरत असलेले शिक्षक पांडुरंग कोकाटे यांना नुकताच प्रदान करण्यात आला आहे.पांडुरंग  कोकाटे हे गेल्या 14 वर्षापासून शिक्षक म्हणून कार्यरत असून 100 टक्के पटनोंदणी,ज्ञानरचना वर्ग,प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अर्तंगत प्रगत वर्ग,मतदार नोंदणी,स्वच्छता अभियान,वृक्षारापणे यामध्ये त्यांनी केलेल्या कार्याचा आढावा घेेवून या पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे.लोकसहभागातून शाळा डिजीटल करणे व इ लर्निंग याबाबत त्यांनी विशेष उल्लेखनिय कार्य केले आहे.      या आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे सभापती नाईकनवर हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून आ.भारत भालके,आ.प्रशांत परिचारक यांच्यासह विविध जि.प.सदस्य,पंचायत समिती सदस्य व गटविकास अधिकारी ज्ञानप्रकाश घुगे,गटशिक्षणाधिकारी सुलभा वठारे,पोपट लवटे,बिभीषण रणदिवे यंाच्यासह पंढरपूर तालुक्यातील बहुसंख्य शिक्षक उपस्थित होते.  

पंढरी वार्ता :-संत गाडगेबाबा विद्यामंदीराचा वार्षिक पारितोषीक वितरण समारंभ संपन्न ! उद्योजक अविनाश वांगीकर यांच्याकडून प्रशालेस झेरॉक्स मशिन भेट !

Image
येथील संत प्रसाद शिक्षण संस्था संचलीत सदगुरु गाडगेबाबा विद्यामंदीर पंढरपर येथे प्रशालेचा वार्षिक पारितोषीक वितरण समारंभ उत्साहपुर्ण वातावरणात संपन्न झाला.या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी उद्याजक अविनाश वांगीकर यांनी यावेळी प्रशालेच्या सोयीसाठी झेरॉक्स मशिन प्रिंटर भेट दिला.या कार्यक्रामाच्या संस्थेचे कार्यध्यक्ष ह.भ.प.अश्‍विन महाराज मनमाडकर हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून अर्बन बँकेचे संचालक मनोज सुरवसे हे उपस्थित होते.या कार्यक्रमास जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे ह.भ.प.गोरले,सामाजिक कार्यकर्ते अरुण गोरे हे उपस्थित होते.     प्रशालेचे मुख्याध्यापक श्री लोखंडे सर यांनी प्रशालेच्या प्रगतीचा आढावा सादर केला.तर डोंगरे मॅडम,कुलकर्णी मॅडम,कणेरे मॅडम,एम.के.गायकवाड यांनी विशेष परिश्रम घेतले,या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन एम.एस.शिंदे यांनी केले.        

पंढरी वार्ता :- पंढरपूर एलआयसी जीवन संकल्प परिवाराच्या वतीने इसबावी येथील सुकन्या वस्तीगृहास 61 हजारांचे अर्थसहाय्य

Image
एलआयसी जीवन संकल्प परिवारातील विमाप्रतिनिधी दरवर्षी आपल्या उत्पन्नातून 1 टक्का इतकी रक्कम सेवाभावी वृत्तीने काम करणार्‍या सस्थांना अर्थिक सहाय्य म्हणून देतात.यावर्षी या संस्थेने इसबावी येथील सुकन्या विद्यार्थीनी वस्तीगृहास 61 हजारांचे अर्थसहाय्य करण्यात आले आहे.     जीवन संकल्प परिवारातील सर्व सदस्यांनी आपल्या प्रतिवर्षीच्या उत्पन्नाच्या 1 टक्के इतकी यापुर्वी कुष्ठरोगी वसाहत येथे संडास बाथरुम,पालवी येथे अभ्यासिका,इमारतीसाठी निधी,लायन्स क्लब संचलित अंधशाळा जोशाबा मतिमंद मुलांची शाळा यांना इमारतीसाठी सहकार्य,लायन्स क्लब संचलीत गतीमंद मुलांची शाळा,सांगोला विद्यामंदीर अनाथ बालकाश्रम,मुकबधीर शाळा बाभुळगाव आदी संस्थांना सहकार्य केले आहे.               यावेळी एलआयसीचे व्यवस्थापक देवीदास पाटील,उपनगराध्यक्ष विशाल मलपे,विकास अधिकारी महादेव ठाकरे,शोभाताई ठाकरे,जीवन संकल्प परिवारातील सदस्य संदेश दोशी,अरविंद येलपले,उमाकांत बागल,सुनिल गायकवाड,पांडुरंग सावंत,वल्लभ पुरंदरे,रमेश बाबर,बाहुबली जेैन,बाळासाहेब इंगोेले,अनिल सुरवसे आदी उपस्थित होते.

पंढरी वार्ता : -नारायण चिंचोली सोसायटीच्या चेअरमनपदी विष्णू मच्छिंद्र माने यांची तर व्हाईस चेअरमनपदी हेमा धमेंद्र नलवडे यांची बिनविरोध निवड !

Image
पंढरपूर तालुक्यातील नारायण चिंचोली येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी विष्णू मच्छिंद्र माने यांची तर व्हाईस चेअरमनपदी हेमा धमेंद्र नलवडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. सोसायटीच्या चेअरमन व व्हा×Yचेअरमन निवडीसाठी सर्व संचालक मंडळाची बैठक होवून यामध्ये चेअरमनपदासाठी विष्णु माने यांचा तर व्हा.चेअरमनपदासाठी .हेमा नलवडे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणुक निर्णय अधिकारी सुळ यांनी जाहीर केले. यावेळी सुळ यांना लेखा परीक्षक पाटके, सचिव भारत माळी यांचे सहकार्य मिळाले. यावेळी माजी बाजार समितीचे माजी उपसभापती लक्ष्मणराव धनवडे, तंटामुक्तीचे अध्यक्ष शिवाजी गुंड, माजी चेअरमन धर्मराज नलवडे, सरपंच विठ्ठल माने, उपसरपंच बळवंत धनवडे, ग्रामपंचायत सदस्य पोपट पाटील, महेश माने, सोसायटीचे सदस्य शिवलिंग हिंगमिरे, तुकाराम कोले, ज्ञानेश्वर बरडे, भास्कर गुंड, श्रीधर कोळेकर, शिवाजी वसेकर, ज्ञानेश्वर मस्के, श्रीमंत बनसोडे, सुधामती मस्के, मंगल गाजरे, सुनिल माने, रामदास मस्के, सचिन घाडगे, भिमराव माने, राजे ग्रुपचे अध्यक्ष राहूल मलपे, विजय पाटील, अमोल सुरवसे, संजय ...

पंढरी वार्ता :- संत गोरोबा कुंभार,संत सेना महाराज,संत रोहीदास,संत नरहरी सोनार,संत दामाजीपंत यांच्या मंदीरांचा तुळशीवृंदावनात समावेश करा - द.बडवे

Image
नमामी चंद्रभागे योजनेअर्तंगत येथील यमाई तलाव परिसरात वनविभागाच्या वतीने जवळपास साडेचार कोटी रुपये खर्चाच्या तुळशी वृंदावनाचे काम सद्या प्रगतीपथावर आहे.या ठिकाणी कंपाऊंड वॉल व रिटेनिंग वॉल तसेच तिकीट घर,सार्वजनिक शौचालय आदी कामे सद्या प्रगतीपथावर आहे.तर येथे आकर्षक तुळशीवनाच्या कामासाठी 42 लाख रुपये खर्चाच्या निविदा निघाल्या आहेत. या तुळशीवृंदावनात 42 लाख रुपये खर्च करुन संत ज्ञानेश्‍वर,संत तुकाराम,संत नामदेव,संत जनाबाई,संत एकनाथ,संत कान्होपात्रा,संत चोखा मेळा,संत सावता माळी यांची आठ मंदीरे उभारण्यात येणार आहेत.त्याबरोबरच इतर संताच्या बाबतीत दुजाभाव न करता या तुळशीवनात संत गोरोबा कुंभार,संत सेना महाराज,संत रोहीदास,संत नरहरी सोनार,संत दामाजीपंत यांच्या मंदीरांचाही समावेश करावा अशी मागणी द.बडवे यांनी केली आहे.

पंढरी वार्ता :- दुधदरवाढ जाहीर करुन नऊ महीने झाले ! अंमलबजावणी केव्हा ? शरद प्रतिष्ठाणचे महादेव जानकरांना निवेदन

Image
राज्याचे दुग्धविकास व पशुसवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी मोठा गाजावाजा करुन जुन 2017 मध्ये दुर दरवाढ करीत असल्याचे जाहीर केले होते.या घोषणेस आता नऊ महिन्याचा कालावधी लोटला तरी सोलापूर जिल्ह्यासह राज्यातील अनेक शेतकरी या दरवाढीच्या लाभापासून वंचीत आहेत.तरी शासनाने जाहीर केल्याप्रमाणे तातडीने दुधउत्पादकांना दरवाढ मिळण्यासाठी कार्यवाही करावी अशी मागणी शरद क्रिडा व सांस्कृतीक प्रतिष्ठाणच्या वतीने ना.महादेव जानकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.   या बाबत अधिक माहीती देताना प्रतिष्ठानचे जिल्हा कार्याध्यक्ष गणेश गोडसे म्हणाले की,राज्यातील दुधउत्पादक शेतकर्‍यांची मागणी लक्षात घेवून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 20 जून 2017 मध्ये राज्यात दुरदवाढीची घोषणा केली होती.मात्र राज्य सरकारने दूध उत्पादक शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी गायीच्या दुधाला दरवाढ जाहीर केली. मात्र, शासनाच्या या निर्णयाला राज्यातील सर्वच दूध संघानी वाटाण्याच्या अक्षता दाखविल्या आहेत. जर का शासनाने दूध दरवाढ देण्यासाठी दबाव टाकला तर प्रसंगी दूध संकलन बंद करण्याचा धमकीवजा इशारा दूध संघांच्यावतीने राज्य सरका...

पंढरी वार्ता :-अवैध वाळूसाठे शोधण्यासाठी सुस्ते येथे पोलीस उपअधिक्षक निखिल पिंगळे यांची सकाळी जोरदार शोध मोहीम ! सायंकाळी सुस्ते येेथील अवैधवाळू साठयांवर महसूल प्रशासनाची कारवाई !

Image
पंढरपूर तालुक्यातील सुस्ते येथे भीमा नदीच्या काठावर तसेच इतरत्रही रात्रभर अवैध वाळू उपसा केलेल्या वाळूचे मोठया प्रमाणात साठे करण्यात आले आहेत.अशी माहीती पोलीस उपअधिक्षक निखिल पिंगळे यांना मिळताच त्यांनी आज सकाळीच या ठिकाणी जावून अक्षरश: नदीकाठ पिंजून काढत ज्या  ठिकाणी संशयीतरित्या अवैध वाळू साठे केल्याचे आढळून आले आहे.त्या ठिकाणच्या वाळूसाठयावर पुढील कारवाईसाठी प्रांताधिकारी सचिन ढोले व तहसिलदार मधूसुदन बर्गे यांना माहीती दिली होती.त्यानंतर महसुल प्रशासनाने या ठिकाणी कारवाई करीत मोठया प्रमाणात साठा केलेली वाळू ताब्यात घेतली आहे.      या कारवाईत येथील जिल्हा परिषद शाळा परिसरासह नदीकाठची शेतजमीन व रस्त्यावर दोन ठिकाणी अवैधरित्या उपसा केलेल्या वाळुचा मोठया प्रमाणात साठा केला असल्याचे निदर्शनास आल्याने महसुल प्रशासनाने कारवाई करीत ही वाळूसाठा जप्त करुन पंढरपूरकडे पाठविण्यात आला आहे.मात्र या कारवाई बाबत महसुल प्रशासनाकडून अधिकृतपणे अधिक माहीती अजूनतरी देण्यात आलेली नाही.           सुस्ते येथे मोठया प्रमाणात अवैध वाळू साठा केला जात असल्याची...

पंढरी वार्ता :- पंढरपूर तालुक्यातील शालेय पोषण आहाराबाबत आ.भारत भालकेंची नाराजी ! पोषण आहारात दुध,अंडी,केळी यासह प्रोटीनयुक्त पदार्थाचा समावेश करण्याची मागणी

Image
पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यात शालेय पोषण आहाराअर्तंगत बालकांना देण्यात येणार आहार हा निकृष्ट दर्जाचा असून या आहारात प्रोटीनयुक्त पदार्थाचा अभाव असल्याने या योजनेचा हेतूच साध्य होत नाही.त्याच बरोबर अनेक शाळांमधून पोषण आहार हा केवळ काही ठरावीक बालकांनाच उपलब्ध केला जातो.मात्र सर्वच बालकांना तो दिला जात असल्याचे कागदोपत्री दर्शविले जाते.त्यामुळे या पोषण आहाराची चौकशी करण्यात यावी व निकृष्ट दर्जाचा शालेय पोषण आहार दिला जात असेल तेथे आकस्मात तपासणी  मोहीम राबवून कारवाई करावी अशी मागणी आ.भारत भालके यांनी केली आहे.               या बाबत आ.भारत भालके यांनी आज विधानसभेत आवाज उठविला असून बालकांना विटॅमीन व प्रोटीन युक्त आहार द्या,आहारामध्ये अंडी,दुध,केळी यांचा समावेश करा अशी मागणी विधानसभेत केली आहे.मात्र या प्रश्‍नास उत्तर देताना शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिले आहे.           शाळांमधून मुलांची प्र्रवेशसंख्या वाढवणे, त्यांच्या गळतीचे प्रमाण आणि कुपोषण रोखणे आणि मुख्य म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील, निम्न स्तरातील मु...

पंढरी वार्ता :-ओबीसी फाऊंडेशनच्या वतीने राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुधीर भोसले यांचा पुरस्कार देवून गौरव

Image
ओ.बी.सी फौंडेशन ओ.बी.सी. जनगणना समितीन ओ.बी.सी.एन.टी. पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सुधीर भोसले यांचा उत्कृष्ट समाजसेवक म्हणून विशेष पुरस्कार देवून गौरव करण्यात आला आहे. या कार्यक्रमास प्रदेशाध्यक्ष संजय  कोकाटे,कार्याध्यक्ष काकासाहेब बुराडे,प्रदेशाध्यक्ष अरुण भाऊ कोळी,प्रदेश संघटक भाऊसाहेब आव्हाड,सुवर्णाताई डहाळे, राष्ट्रवादी कॉग्रेेस ओबीसी सेलचे शहराध्यक्ष अनिल सप्ताळ आदी उपस्थित होते.                राष्ट्रवादी कॉग्रेसचे शहराध्यक्ष सुधीर भोसले हे गेल्या दोन दशकापासून पंढरपूर शहरातील विविध सामाजिक उपक्रमात हिरहिरीने सहभागी होत आले असून त्यांनी केलेल्या विविध सेवाभावी कार्याची दखल घेवून हा पुरस्कार देवून त्यांचा गौरव करण्यात आला आहे.राष्ट्रवादी कॉग्रेसच्या शहराध्यक्षपदाची धुरा संभाळल्या नंतर त्यांनी शहरातील विविध महत्वपुर्ण प्रश्‍नांबाबत अतिशय जागरुकपणे आपली भुमिका पार पाडली आहे.सुधीर भोसले यांचा विशेष पुरस्कार देवून गौरव करण्यात आल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

पंढरी वार्ता :- आ.प्रणितीताई ... सोलापूरसाठी सोडलेल्या पाण्यामुळे आमच्या लेकराबाळांची अन् जनावरांची पिण्याच्या पाण्यासाठी वणवण थांबते ! दुहेरी पाईपलाईनचा विषय जरा बाजुला ठेवा ! नदीकाठच्या ग्रामिण जनतेमधून व्यक्त होत आहे अपेक्षा !

Image
हे विठ्ठला मला माफ कर .. तुझी चंद्रभागा अडवून शेतकर्‍यांच्या दारापर्यंत पोहोचविण्यासाठी मी उजनी धरणाच्या पायाभरणीची  कुदळ आज मारतोय अशी भावना उजनी धरणाच्या पायाभरणीच्या कार्यक्रमावेळी तात्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी व्यक्त केली होती.उजनी धरणाच्या निर्मितीसाठी या जिल्हयातील लाखो शतेकर्‍यांनी आपल्या जमिनी गमावल्या आहेत.आपल्या जमीनीचे लचके तोडून धरणग्रस्तांना दिले आहेत.या धरणासाठी सर्वात मोठा त्याग ग्रामिण जतनेने केला आहे.त्याच वेेळी या धरणाच्या निर्मितीवेळी सिंचनास प्रथम प्राधान्य देण्याचे धोरण आखले गेले होते.व शेतीस पाणी पुरवठा करण्यासाठी बारमाही पाणी पुरवठ्याचे धोरण आखण्यात आले होते.मात्र पुढे हे धोरण आठमाही करण्यात आले.        उजनी धरणातील पाण्याचे दोन वर्षासाठी नियोजन करण्याचे खुळ या सरकारच्या डोक्यामध्ये असतानाच एकीकडे सोलापूर साठी म्हणून भीमा नदीत पाणी सोडले जाते त्याच वेळी नदीकाठच्या शेतकर्‍यांना मात्र वीजेचे कनेक्शन तोडून पिण्याच्या पाण्यापासूनही वंचीत ठेवले जाते हा अन्याय या धरणासाठी त्याग केलेला शेतकरी आतापर्यंत सहन करीत आलेला आहे.सोलापूर क...

पंढरी वार्ता :- ‘मी वडार महाराष्ट्राचा’ संघटनेच्या वतीने विजय चौगुले यांच्या नेतृत्वाखाली पंढरीत मुकमोर्चा काढण्यात येणार !

Image
नगरसेवक संदीप पवार यांच्या खुन प्रकरणानंतर कष्टकरी वडार समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.सामान्य वडार समाज हा आपल्या पारंपारीक व्यवसायात व बांधकाम क्षेत्रात मोलमजुरी करुन आपला उदरनिर्वाह करीत आहे.या खूनाच्या घटनेनंतर या समाजात भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे.या समाजावर वारंवार होणार्‍या अन्यायाच्या निषेधार्थ मी वडार महाराष्ट्राचा या संघटनेचे संस्थापक व वडार समाजाचे नेते विजय चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरीत वडार समाजाच्या वतीने मुकमोर्चा काढणार असल्याचे निवेदन पंढरपूर शहर पोलीस निरिक्षक विठ्ठल दबडे यांना आज देण्यात आले आहे.                 यावेळी या संघटनेचे विविध पदाधिकारी व वडार समाजातील नगरसेवकांनी येथे उपस्थित असलेले पोलीस उपअधिक्षक निखिल पिंगळे यांच्या मुकमोर्चाच्या आयोजनाची भुमिका स्पष्ट केली असता पोलीस उपअधिक्षक निखिल पिंगळे म्हणाले की, झालेली खुनाची घटना विशिष्ट समाज म्हणून घडलेली नसून वैमनस्यातून घडलेली आहे.मात्र ही घटना अतिशय दुदैवी आहे.पोलीसांनी घटना घडल्यापासून आजतागायत योग्य दिशेने तपास करीत आरोपींना ताब्यात घेतले आहे.य...

पंढरी वार्ता :- कोर्टी रस्त्यावरील ‘त्या’शिक्षण संस्थेचे नाव मोठे लक्षण खोटे ? पालक आंदोलनाच्या पावित्र्यात तर सहा महिन्यापासून शिक्षकाचे पगार थकीत ?

Image
पंढरपूर शहर व परिसरात गेल्या दोन दशकात अनेक मोठ मोठया शिक्षण संस्था उभारल्या गेल्या आहेत यामुळे सोलापूर जिल्ह्यातच नव्हे तर अगदी देशभरातून विद्यार्थी येथे शिक्षणासाठी येत असतात.गोपाळपूरच्या माळरानावर प्रा.बी.पी.रोंगे सर यांच्या मार्गदर्शनाखालील  विठ्ठल अभियांत्रीकी महाविद्यालयाने नॅकचे  मुल्यांकन प्राप्त करण्याबरोबरच देशभरातील एक प्रतिष्ठीत महाविद्यालय म्हणून प्रतिमा निर्माण केली आहे.मात्र त्याचवेळी पंढरपूर शहराच्या आसपास नव्याने उभारण्यात आलेल्या एका शिक्षण संस्थेने मात्र  अगदी सुरुवातीपासूनच शिक्षणाचा धंदा मांडला आहे असा आरोप होत आला होता.पुणे-मुंबईच्या धर्तीवर मोठ मोठे कॅम्पस उभारुन विद्यार्थ्यांना आकर्षीत करण्यात अनेक शिक्षण संस्थाचालक यशस्वी होत असतानाच कोर्टी रोड वरील शिक्षणाचा गड असल्याचा दावा करीत असलेल्या एका नामांकीत संस्थेने यावर्षी पुन्हा फी वाढीचा घाट घातल्यानंतर गेल्यावर्षी फी वाढ केलेली असताना यावर्षी पुन्हा पी वाढीची गरजच काय असा प्रश्‍न विचारणार्‍या पालकांना परवडत नसेल तर आपल्या पाल्यांना इतर शाळेत घाला असा अनाहूत सल्ला येथील यासंस्थेचा या संस्थेचे ये...

पंढरी वार्ता:-भीमा नदीवरील सर्व बंधारे भरुन घ्या अन्यथा पुळूज बंधार्‍यात जलसमाधी घेवू- बळीराजा शेतकरी संघटनेचा इशारा नदीकाठची ग्रामिण जनतेवर अन्यायामुळे ‘बळीराजा’संतप्त !

Image
गेल्या दोन महिन्यापासून ग्रामिण जनतेचे व जनावरांचे पिण्याच्या पाण्यासाठी हाल होत असून ग्रामिण जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागत आहे.सद्या उजनीधरणातून भीमा नदीतून सोलापूर शहरासाठी पाणी सोडले आहे.मात्र त्याचवेळी नदीकाठच्या भागातील वीज पुरवठा खंडीत केला जात आहे.ग्रामिण जनतेचे होणारे हाल प्रशासनास दिसत नाहीत का ? भीमा नदीत सोडलेल्या  पाण्याने नदीवरील सर्वबंधारे पुर्ण क्षमतेने भरुन घेवून ग्रामिण जनतेचे हाल थांबवावेत अन्यथा 31 मार्च रोजी पुळूज येथील बंधार्‍यावरु अनेक शेतकर्‍यांसह बळीराजा शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते जलसमाधी घेतील असा इशारा बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने भीमा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री जगताप यांना दिेलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.      यावेळी बोलताना बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माऊली हळणवर म्हणाले की,भीमा नदीच्या काठावर असलेले ग्रामस्थही या  देशाचे नागरिक आहेत.शेतीसाठी पाणी मिळावे म्हणून त्यांच्या कडून पाणी पट्टी वसूल करुन पाणी परवानेही देण्यात आले आहेत.तर अनेक शेतकर्‍यांकडून सद्या पाणी पट्टी थकबाकी वसुल केली ...

पंढरी वार्ता :- पंढरीतील गुंडगीरी आणि भुरटेगीरीवर नियंत्रण ठेवण्यासाठी लोकप्रतिनिधी,वरिष्ठ पोलीस अधिकारी,व्यापारी व सामान्य तक्रारदार नागरिक यांच्या बैठकीचे प्रत्येक महिन्यात आयोजन ? जिल्हा पोलीस प्रमुखांकडे पत्राद्वारे पोलीस लोकशाही दिनाची मागणी करणार -आ.भारत भालके

Image
पंढरपूर शहरातील गुंडगीरी,वारंवार घडणार्‍या टोळीयुध्दाच्या घटना आणि सर्वसामान्य जनता,व्यापारीवर्ग यांना होणारा गुंडगीरीचा व भुरटेगीरीचा त्रास यामुळे पंढरपूर शहरात व्यापारी व सर्वसामान्य नागरिक यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येते.अशातच अनेक गुंडाना राजकीय वरदहस्त प्राप्त असल्याने तसेच निवडणूकीत आपल्या प्रभागातून वरिष्ठ नेतेमंडळींना निवडणूकीत येनकेन प्रकारे लिड देण्याचे कसब अनेक गुंडानी आत्मसात केल्याने त्यांना प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी त्यांच्या अंगावर पांढरे डगले चढवून त्यांना राजकारणाच्या प्रवाहात आणले गेल्याची चर्चा पंढरीत दबक्या आवाजात अनेकवेळा होताना दिसून येते.येथील व्यापारी,सामान्य नागरिक व बुध्दीजीवी वर्ग याबाबत आतून कमालीचा अस्वस्थ असला तरी उघडपणे तो या बाबत प्रतिक्रीया देण्यास धजावत नसल्याचे दिसून येते.एकवेळ पंतप्रधान नरेेंद्र मोदी विरोधात आम्ही बोलू शकतो पण गावच्या अथवा गल्लीतील भुरटया गुंडाबाबत आम्ही बोलू शकत नाही अशी खंत अनेक जागरुक(?) नागरिक नेहमीच व्यक्त करीत असतात.              नगरसेवक संदीप पवार यांच्या हत्येनंतर ...

पंढरी वार्ता :- पंढरीतील ठरावीक रिक्षा चालकांचेच होणार ‘कल्याण’. रिक्षा चालक कल्याणकारी मंडळाच्या घोषणेनंतर ‘कंत्राटी’चालकांमध्ये अस्वस्थता.

Image
 गेल्या पाच ते सहा वर्षांपासून रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी मंडळाची मागणी करण्यात येत होती. या मागणीला आता वैधानिक स्वरूप प्राप्त होणार असून वित्तमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी नुकताच चौथा अर्थसंकल्प बजेट सादर केला असता, यामध्ये ऑटो रिक्षा चालक कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याची घोषणा झाल्याने अहमदनगर जिल्हा ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक-मालक संघटनेच्या वतीने करण्यात आलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. महाराष्ट्रात जवळपास 20 लाखापर्यंत रिक्षा चालकांची संख्या आहे. त्यांच्या विविध प्रश्‍न व अडचणी सोडविण्यासाठी ऑटो रिक्षा चालक कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याची मागणी   रिक्षा चालक -मालकांच्या वतीने करण्यात येत होती.    रिक्षा चालक मालकांसाठी परिवहन विभागाच्या अंतर्गत स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यात यावे. ओला उबेर या भांडवलदार कंपन्यांवर कारवाई व्हावी, पुणे सह महाराष्ट्रातिला सर्व जिल्ह्यात रिक्षा पासिंग साठी ट्रॅक उपलब्ध करावे, रिक्षा साठी 100 मिटर ट्रॅकला मान्यता देण्यात यावी, रिक्षा चालक मालकांसाठी सरकारने मोबाईल ऍप तयार करावे.विधान परिषदे मध्ये रिक्षाचालक प्रतिनिधींची न...

पंढरी वार्ता :- आमदार भारत भालकेंचे नामदार चंद्रकांत पाटलांना स्मरण पत्र ! सरगम चौक ते क्रांतिसिंह नाना पाटील चौक रस्ता दुभाजकाची 2016 मध्येच केली होती मागणी

Image
पंढरपूर शहरातील सर्वात जास्त वर्दळीचा व अपघात प्रवण असलेल्या सरगम चौक ते क्रांतिसिंह नाना पाटील चौक या रस्त्यावर रस्ता दुभाजक करावेत अशी मागणीच नाही असे विधानपरिषदेत उत्तर देणार्‍या नामदार चंद्रकांत पाटलांबद्दल पंढरपूर शहरात कामालीची नाराजी व्यक्त होत असून विविध पक्ष,संघटनांनी या रस्त्यावर होणार्‍या अपघाताची दखल घेत या रस्त्यावर तातडीने रस्ता दुभाजक करावेत अशी मागणी येथील तहसिल व प्रांत कार्यालयात अनेकवेळा निवेदनाद्वारे केली आहे.तळेहिप्परगे येथील अभियांत्रीकीच्या विद्यार्थ्याचा नुकताच याच रस्त्यावर अपघाती मृत्यु झाल्यानंतर पुन्हा अनेक संघटनांनी आक्रमक होत या ठिकाणी तातडीने रस्ता दुभाजक करावा अशी मागणी केली होती.मात्र विधानपरिषदेत याबाबत प्रश्‍न उपस्थित झाल्यानंतर अशी कुठली मागणीच नाही व या रस्त्यावर वारंवार अपघात होतात हे खरे नाही असे उत्तर ना.चंद्रकांत पाटील यांनी दिले होते.              याबाबतचे वृत्त सर्वप्रथम पंढरीवार्ताच्या आपलं पंढरपूर या न्युजपोर्टलवरुन प्रकाशित झाल्यानंतर आ.भारत भालके यांनी तातडीने सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.चंद्रकांत पाटलां...

पंढरी वार्ता :- कै.लक्ष्मण कवडे सर्वधर्मिय सामुदायीक विवाह सोहळा मंडळाच्या वतीने 11 एप्रिल रोजी पंढरीत सामुदायीक विवाह सोहळ्याचे आयोजन

Image
गेल्या चार वर्षापासून पंढरीत यशस्वीरित्या सर्वधर्मिय सामुदायीक विवाह सोहळ्याचे आयोजन करणार्‍या के.लक्ष्मण कवडे सर्वधर्मिय सामुदायीक विवाह सोहळा मंडळाच्या वतीने 11 एप्रिल रोजी येथील छत्रपती शिवाजी चौक येथील शिवतिर्थावर सामुदायीक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहीती या संस्थेचे उपाध्यक्ष अतुल लटके यांनी दिली आहे.           सद्याच्या महागाईच्या काळात विवाहासारख्या समारंभावर कितीही बचत करावयाचा प्रयत्न केला तरी लाखभर रुपये तरी हमखास खर्च होत असल्याचे दिसून येते.उपवर झालेल्या मुलीच्या विवाहाच्या चिंतेने अनेक शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याच्या घटना महाराष्ट्रात घडत आहेत.तर शहरी भागात बरोजगारीचा भस्मासूर अनेक कुटुंबाना उध्वस्त करीत आहे अशा वेळी मुलाच्या अथवा मुलीच्या विवाहाच्या खर्चास फाटा देत सामुदायीक विवाह सोहळा हाच एक उत्तम पर्याय आहे.हे लक्षात घेवून कै.लक्ष्मण कवडे सर्वधर्मिय सामुदायीक विवाह सोहळा मंडळाच्या वतीने गेल्या चार वर्षात 51 जोडप्यांच्या रेशीम गाठी बांधल्या असून 102 कटुुुंबाना कर्जाच्या घाईत जाण्यापासून वाचवले आहे.या विवाह सोहळ्यात संस्थेच्या...

पंढरी वार्ता :-कासेगाव येथील अंश इंडस्ट्रिज या कोरोगेटेड बॉक्स कारखान्यास आग युवा उद्योजकाचे लाखो रुपयांचे नुकसान

Image
पंंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर अनवली रस्त्यावरील कासेगाव हद्दीत असलेल्या अंश इंडस्ट्रिज या कोरोगेटेड बॉक्स तयार करणार्‍या कारखान्यास रविवारी पहाटे 2 च्या सुमारास शॉटसर्किटने आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.या घटनेची  पंढरपूर नगरपालीकेच्या अग्नीशमन दलास माहीती दिल्यानंतर त्यांनी तात्काळ धाव घेत आग विझविण्यासाठी प्रयत्न केले.मात्र तो पर्यंत आगीने रुद्र रुप धारण केल्याने संपुर्ण कारखाना व येथील यंत्रसामुग्री,तयार व कच्चा माल आगीच्या भक्षस्थानी पडला.          अनवली येथील युवा उद्योजक बाळकृष्ण दिगंबर सुर्यवंशी यांनी बेदाणा व दाळींबासाठी लागणार्‍या बॉक्सची गरज ल क्षात घेवून मोठया जिद्दीने 2015 मध्ये हा कारखाना उभा केला होता.संपुर्ण सोलापुर जिल्ह्यात येथे तयार होणार्‍या कोरोगेटेड बॉक्सला मागणी होती.गेल्या तीन वर्षाच्या कालावधीत या कारखान्याची यशस्वी वाटचाल सुरु असतानाच या आगीच्या घटनेमुळे हा कारखाना पुरता उध्वस्त झाला असून एका युवा उद्योजकाच्या यशस्वीपणे सुरु असलेल्या व्यवसायावर आपत्ती आल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

पंढरी वार्ता :- धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांच्या हस्ते रेणुका इंजिनिअरींग वर्क्सचे उदघाटन ! आजच्या तरुणाईने उद्योजविश्‍वातील नव्या नव्या संधीचा शोध घ्यावा - अभिजीत पाटील

Image
पंढरपूर तालुक्यातील पिराची कुरोली येथे युवा उद्योजक विकास व समाधान रायगुडे यांनी उभारलेल्या रेणुका इंजिनिअरींग वर्क्स चे उदघाटन धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन व डि.व्ही.पी.उद्योग समुहाचे प्रमुख अभिजीत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी बोलताना अभिजीत पाटील म्हणाले की,आजच्या तरुणाईने केवळ नोकरीच्या माद्यमातूनच रोजगाराच्या संधी न शोधता विविध स्वयंरोजगाराचा व व्यवसायाचा अभ्यास करुन यात पदार्पण केल्यास यश निश्‍चित असते.गरज असते ती फक्त चिकाटीची आणि स्वत:ला झोकुन देण्याची.आज पिराची कुरोली येथे रेणुका इंजिनिअरींगच्या माध्यमातून एका नव्या व्वयसायाची मुहुर्तमेढ होत आहे हा ग्रामिण भागातील तरुणासांठी आदर्श आहे असे प्रतिपादन यावेळी या उदघाटक या नात्याने बोलताना अभिजीत पाटील यांनी केले.       यावेळी विठ्ठल रुक्मिणी मंदीर समितीचे सदस्य संभाजीराजे शिंदे, धाराशिव साखर कारखान्याचे संचालक संतोष कांबळे,उद्योजक पद्माकर बागल,पिराची कुरोलीचे सरपंच कुलदिप कौलगे,बाळासाहेब कौलगे,तानाजी बागल,रामभाऊ गिड्डे यांच्यासह ग्रामस्थ व परिसरातील युवक मोठया संख्येने उपस्थित होते.

पंढरी वार्ता :- सरगम चौक ते क्रांतीसिह नाना पाटील चौक या रस्त्यावर रस्ता दुभाजकाची मागणीच नाही. अन् या रस्त्यावर वारंवार अपघात होतात हे खरे नाही ! सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटलांचे विधानपरिषदेत संतापजनक उत्तर. विविध पक्ष,संघटना व संस्थांनी डझनावारी दिेलेली निवेदने गेली कुठे ? आणखी किती बळी गेल्यानंतर ना.चंद्रकांत पाटील दखल घेणार ?

Image
पंढरपूर शहरातील सरगम चौक ते क्रांतिसिंह नाना पाटील चौक या रस्त्यावर वांरवार अपघाताच्या घटना घडत असून यामध्ये अनेकांचा बळी गेला आहे.या रस्त्यावरच यशवंत विद्यालय,कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय आहे.तर अरिहंत स्कुल,कर्मयोगी कॉलेज कडे जाणारे याच रस्त्याने ये-जा करतात. तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपला कृषीमाल विक्रीसाठी घेवून येत असल्याने या रस्त्यावर मोठया प्रमाणात वर्दळ असते.तर इसबावी या शहराच्या सर्वात मोठया उपनगराकडे जाणारा हा रस्ता असल्याने या उपमनगरात राहणारे अबालवृध्द नागरिक व विद्यार्थी याच रस्त्याने ये-जा करतात. या रस्त्यावर गेल्या काही वर्षात सातत्याने अपघाताच्या घटना घडत असून अनेकांचा बळी गेला आहे.येथे वारंवार घडणार्‍या अपघाताची दखल घेत पंढरपूर शहरातील विविध सामनाजिक संघटना,पक्ष संघटना यांनी अनेकवेळा रस्ता दुभाजक झाल्यास अपघात टळतील तरी तातडीने रस्ता दुभाजक करावेत अशी मागणी केली होती.तशा आशायाची निवेदनेही येथील तहसिलदार व प्रांत कार्यालयात देण्यात आली होती.पंढरपूरकरांच्या अतिशय जिव्हाळ्याचा असलेला हा आ.श्रीकांत देशपांडे यांच्यासह विविध आमदारांनी विधानपरिषदेत उपस्थित ...

पंढरी वार्ता :- अंबाबाई पटांगण ते अर्बन बँक रस्त्याचे काम रखडले ! 11 आमदारांनी थेट विधानपरिषदेत व्यक्त केली नाराजी

Image
पंढरपूर शहराचे प्रवेशद्वार असलेल्या जुना सोलापुर रस्त्यावरील अंबाबाई पटांगण ते अर्बंन बँक या रस्त्याच्या रुंदीकरणाचे व कॉक्रीटीकरणाचे काम गेल्या आठ महिन्यापासून अतिशय संथगतीने सुरु असून या कामासाठी पुरेसा निधी उपलब्ध असानाही व शहरात प्रवेश करण्याचा हा महत्वाचा रस्ता दिर्घकाळ वाहतुकीसाठी बंद असल्याने पंढरीत येणार्‍या भाविकांना व ग्रामिण जनतेस मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विविध सामाजिक संघटना,पक्ष संघटना यांनी या बाबत वेळोवेळी नगर पालीकेस निवेदने दिली होती.तर कोळी महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष अरुणभाऊ कोळीॅ यांनी या ठेकेदारावर कारवाई करावी या मागणीसाठी नगर पालीकेसमोर धरणे आंदोलनही केले होते.तर मा.नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट यांनीही या परिसरातील नागरिकांच्या भावना लक्षात घेवून नगर पालीकेच्या अधिकार्‍यांना व ठेकेदारांना बोलावून परिस्थीतीचे गार्भिय लक्षात आणून दिले होते.मात्र तरीही या रस्त्याचे काम अतिशय संथगतीनेच सुरु असल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.या जनभावनेची दखल घेत विधानसभेतील 11 आमदारांनी  थेट विधानपरिषदेत हा प्रश्‍न उपस्थित केला असून या बाबत विधानपरिषदेत खुद्द मुख्...

पंढरी वार्ता :- पाणी परवाने देता आणि विद्युतपुरवठा खंडीत करण्याचे आदेशही देता, हा अन्याय सहन करणार नाही - गणेश गोडसे. गुरसाळे येथे ग्रामस्थ व शरद क्रिडा प्रतिष्ठाणच्या वतीने महावितरणच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन

Image
एकीकडे शेतकर्‍यांना पाईपलाईन करण्यासाठी परवानगी द्यायची,पाणीपट्टी भरुन पाणी परवाने द्यावयाचे आणि त्याच वेळी उजनी धरणातून पाणी सोडल्यानंतर लाईट कनेक्शन बंद करावयाचे,आम्हास पिण्याच्या पाण्यापासून देखील वंचीत ठेवायचे हा अन्याय आता आम्ही सहन करणार नाही.गुरसाळे येथील नदीकाठच्या परिसरातील बंद करण्यात आलेला विद्युतपुरवठा त्वरीत सुरु करा अन्यथा आज या मागणीसाठी रस्ता रोको आंदोलन केले आहे उद्या अधिकार्‍यांच्या गाड्या जाग्यावरुन हलू देणार नाही  असा इशारा समस्त गुरसाळे ग्रामस्थांच्या व शरद क्रिडा व सांस्कृतीक प्रतिष्ठाणच्या  वतीने गुरसाळे येथे करण्यात आलेल्या रस्ता रोको आंदोलनावेळी महावितरणच्या अधिकार्‍याना निवेदन देताना गणेश गोडसे यांनी दिला आहे.        या आंदोलनाच्या वेळी या परिसरातील पाणीप्रश्‍न अतिशय गंभीर झाल्याने प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.पोलीसांनी वेळीच दखल घेत चोख बंदोबस्त ठेवल्याने पुढील गंभीर प्रसंग टळला असल्याचे दिसून आले.उजनी धरणातून सद्या कालव्याद्वारे पाणी सोडण्यात आले असून वीज पुरवठा वारंवार खंडीत केला जात असल्याने ग्रामिण भागातील नागरिक...

पंढरी वार्ता :- पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्याी सावित्रीमाई फुले शिष्यवृत्ती योजनेपासून वंचीत. आ.भारत भालके यांनी विधानसभेत उपस्थित केला प्रश्‍न.मार्च 2018 अखेर शिष्यवृत्ती अदा करण्याचे ना.राजकुमार बडोले यांचे आश्‍वासन.

Image
पंढरपूर-मंगळवेढा तालुकयातील जिल्हा परिषदेच्या व खाजगी अनुदानीत शाळांमध्ये शिकणार्‍या मागासवर्गीय विद्यार्थीनींना जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाने गेल्या दोन वर्षापासून शिष्यवृत्तीपासून वंचीत ठेवले असल्याने मागासवर्गीय विद्यार्थीनींवर मोठा अन्याय होत आहे.या बाबत सोलापूर जिल्ह्यातील विविध शिक्षक संघटना व समन्वय समितीच्या वतीने 29 डिसेंबर 2017 रोजी आंदोलनाचा इशाराही देण्यात आला होता.मात्र आजतागायत याबाबत जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडून कुठलीही कार्यवाही केली जात नसल्याने आ.भारत भालके यांनी हा प्रश्‍न थेट विधानसभेत उपस्थित केला.एकीकडे शासन शालेय विद्यार्थीनींसाठी अनेक महत्वपुर्ण योजना राबविण्यात येत असल्याचा दावा करीत असतानाच शासनाच्या विविध विभागाकडून या योजनांच्या अंमबजावणीत मोठा हलगर्जीपणा केला जात आहे.सोलापूर जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडूनही अशाच प्रकारचा हलजर्गीपणा होत असून त्यामुळे मागासवर्गीय मुलींना मात्र हे शैक्षणिक वर्ष संपत आले तरी अजून सावित्रीमाई फुले शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळाला नाही.या गंभीर प्रकाराची दखल घेवून कारवाई करावी अशी मागणीही आ.भारत भालके यांनी ...

पंढरी वार्ता :- करकंब येथील वीज ट्रॉन्सफार्ममर 15 दिवसापासून बंद ! भोसेपाटी येथे रस्ता रोेकोचा राष्ट्रवादी किसान सभेचा इशारा

Image
पंढरपूर तालुक्यातील करकंब येथील 5 एम.व्ही.चा ट्रान्सफार्ममर 15 दिवसापुर्वी जळाला असून त्यामुळे भोसे व भोसे परिसरात अनियमित विजपुरवठा होत आहे.सद्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले आहे.ऊस व इतर उभी पिके पाण्याअभावी जळून जावू लागली आहेत.याबाबत महावितरणचे अधिकारी व कर्मचारी यांच्याकडे विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत आहेत.त्यामुळे वीजेअभावी पाणी देता येत नसल्याने पिके जळून जाताना पाहून शेतकर्‍यांच्या भावना संतप्त होऊ लागल्या आहेत.सद्या आठतास ऐवजी सहा तास वीजपुरवठा कमी दाबाने व तोही अनियमीत मिळत असून शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान होत आहे.या गंभीर बाबीची महावितरणच्या अधिकार्‍यांनी दखल न घेतल्यास 18 मार्च रोजी भोसे पाटी येथे समस्त गावकर्‍यांना घेवून रास्ता रोको करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी किसान सभेच्या वतीने महावितरणच्या अधिकार्‍यांना निवेदनाद्वारे दिला आहे.    या निवेदनावर राष्ट्रवादी किसान सभेचे जिल्हाध्यक्ष मारुती जाधव,राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुधीर भोसले,राष्ट्रवादीचे किसान सभा जिल्हा उपाध्यक्ष मारुती भिंगारे,जिल्हा सरचिटणीस शंकर शिंदे नाईक,तालुकाध्यक्ष क...

पंढरी वार्ता :-शहरातील अर्पुणावस्थेतील पाण्याच्या टाकीचा विषय अखेर विधानसभेत . ठेकेदारास पाठीशी घालणार्‍या जीवन प्राधिकरणच्या अधिकार्‍यांवर कारवाई होणार ?

Image
पंढरपूर शहरातील महावीर नगर येथे अपुर्णावस्थेत असलेल्या पाण्याच्या टाकीचा प्रश्‍न गेल्या सात वर्षापासून सातत्याने उपस्थित होत असून या टाकीचे काम चुकीच्या पध्दतीने व निकृष्ट दर्जाचे झाले आहे अशा आशयाचा पत्रव्यवहार नगर पालीकेच्या वतीने वारंवार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पंढरपूर येथील कार्यालयाशी केला गेला आहे. तिर्थक्षेत्र विकास आराखडयातून उभारण्यात आलेल्या टाकीचा विषय अगदी उभारणीपासून वादाच्या भोवर्‍यात सापडला होता.वर्क ऑर्डर दिल्यानंतर विहीत वेळेत या टाकीचे काम पुर्ण न झाल्याने ठेकेदारावर व या कामाची जबाबदारी असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या संबधीत अभियंत्यावर कारवाई करावी अशी मागणी सातत्याने होत आली आहे.मात्र राजकीय दबावापोटी या अभियंत्यावर कारवाई केली जात नसल्याचे समजते.         पंढरपूर शहराचा वाढता विस्तार,भाविकांची वर्दळ व भविष्यातील पिण्याच्या पाण्याची मागणी लक्षात शहरात ठिकठिकाणी जलकुंभ उभारुन विविध भागात सुरळीत व योग्य दाबाने पाणी पुरवठा करण्याच्या हेतूने शहरात विविध ठिकानी पाण्याच्या टाक्या उभारण्यासाठी कोटयावधी रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला.शह...

डि.व्ही.पी.मार्टचा उदघाटन सोहळा उत्साहात संपन्न. वीर माता-पिता व वीरपत्नीच्या हस्ते उदघाटन

Image
डि.व्ही.पी.उद्योग समुहाच्या माध्यमातून विविध उद्योगव्यवसायात दमदारपणे वाटचाल करीत असलेल्या येथील डि.व्ही.पी.ग्रुपने डि.व्ही.पी.मार्टच्या माध्यमातून पंढरपूरकरांसाठी ग्राहकोपयोगी व नित्याच्या वापरातील वस्तुंच्या एकाच छताखाली खरदीचा एक नवा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे.या  कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय रस्त्यावर असलेल्या डि.व्ही.पी.स्क्वेअर या बहुमजली इमारतीच्या तळमजल्यावरील या मार्टचा शहीद मेजर कुणालगीर गोसावी यांच्या जयंतीचे औचित्य साधत सोमवारी वीरमातापिता वृंदा मुन्नागीर गोसावी व वीरपत्नी उमा कुणालगीर गोसावी यांच्या हस्ते करण्यात आले.     यावेळी सोलापुरचे माजी जिल्हाधिकारी गोकुळ मवारे, मनसेचे जिल्हा संघटक दिलीप धोत्रे,श्री शहा,श्री वाकी, डि.व्ही.पी.ग्रुपचे अध्यक्ष धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील,अमर पाटील,श्रीकांत बोरगावकर,श्रीनिवास बोरगावकर यांच्यासह डि.व्ही.पी.गु्रपचे सर्वसदस्य उपस्थित होते.या उदघाटन सोहळ्याच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी पंढरपूर शहर व तालुक्यातील हजारो हितचिंतकांनी यावेळी उपस्थिती दर्शवून शुभेच्छा दिल्या.     डि.व्ही.पी.स...

पंढरी वार्ता विशेष:- ‘सत्त्यांचा’ शोध घेण्याचे पंढरपूर पोलीसांसमोर आव्हान ! कट्टयावर गप्पा मारता मारता हातात कट्टा घेवू लागली तरुणाई. राजकीय रसद तोडण्यासाठी जनतेचाच दबाव आवश्यक !

Image
नगरसेवक संदीप पवार यांची भरदिवसा वर्दळीच्या ठिकाणी झालेल्या निर्घृण हत्येनंतर पंढरपूर पोलीसांचा तपास योग्य दिशेने सुरु असल्याचे सांगीतले जात असतानाच आज ठाणे पोेलीसांनी या हत्या प्रकरणाती चार आरोपींना शस्त्रांसह ताब्यात घेतले आहे.व हे प्रकरण टोळी युध्दातूनच झाले असल्याचे जवळपास स्पष्ट होत आहे.मात्र या घटनेमुळे पंढरपूर शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.गेल्या काही वर्षात पंढरपूरच्या गुन्हेगारीचे स्वरुप बदलत असून एकेकाळी हातात दांडगे घेवून भांडणासाठी पुढे येणारे ‘भाई’़प्रवर्गात मोडत होते.मात्र दांडक्यापासून तलवारी मिरवण्यापर्यंतचा येथील गुंडगीरीचा प्रवास आता थेट गोळीबारापर्यंत पोहोचला असून कट्टयावर गप्पा मारत बसणारी व नुकतेच मिसरुट फुटलेले अनेक तरुण सत्त्या चित्रपटाप्रमाणे ‘भाई’ बनण्याचा शौक बाळगत असल्याचे दिसून येते.अशातच वाळू चोरी,अवैध सावकारी व त्यातून वसूल होणारी दंडाची वरकढ कमाई याचे मोठे आकर्षण पंढरीतील शिक्षीत आणि सुशिक्षीत परंतू बेकार असलेल्या अनेक तरुणांमध्ये निर्माण झाल्याचे दिसून येते.यातूनच पंढरपूर शहराचा गेल्या चार दशकातील राजकीय व सामाजिक इत...

पंढरी वार्ता :- संदीप पवार यांच्या हत्येनंतर सीसीटिव्ही फुटेजसाठी पोलीसांची धावाधाव ! दहशतीच्या सावटाखालील पंढरीत सीसीटिव्ही प्रकल्पाच्या अंमलबजावणीची गरज अधोरेखीत

Image
रविवारी स्टेशनरोड सारखा वर्दळीच्या ठिकाणी भरदुपारी थेट हॉटेलात शिरुन नगरसेवक संदीप पवार यांची हत्या करण्यात आल्यानंतर हल्लेखोरांच्या शोधासाठी पोलीसांनी तातडीने परिसरातील सीसीटिव्ही फुटेज तपासून पाहण्यासाठी धावाधाव सुरु केली.यावेळी इतक्या वर्दळीच्या ठिकाणीही काही मोजक्याच व्यापार्‍यांनी व व्यवसायीकांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्याचे निदर्शनास आल्याने पोलीसांची मोठी गोची झाल्याचे दिसून आले.ज्या हॉटेल श्रीराम मध्ये हत्येची घटना घडली आहे तेथे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले नव्हते.पंढरपूर शहरातील सार्वजनिक वावर असलेल्या व्यवसायीकांनी आपल्या हॉटेल,स्विट होम,दुकाने तसेच बँका,पतसंस्था,ज्वेलरी शॉप आदी ठिकाणी सीसीटिव्ही कॅमेरे बसवावेत असे आवाहन वारंवार शहर पोलीस ठाण्यांकडून करण्यात येत होते.मात्र त्याकडे अनेकांनी दुर्लक्ष केल्याचेच दिसून आले आहे.        पंढरपूर शहरास असलेला दहशतवादी हल्लयाचा धोका,यात्रा कालावधीत घडणार्‍या गुन्हेगारी स्वरुपाच्या घटना आणि त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे पंढरपूरात सातत्याने होत असलेल्या हत्येच्या व अज्ञात हल्लेखोरांकडून केल्या जाणार्‍या जिवघेण्या ह...

पंढरी वार्ता :- भय इथले संपत नाही ! पंढरीत नगर सेवक संदीप पवार यांच्यावर खुनी हल्ला ! ऐन वर्दळीच्या ठिकाणी हॉटेलात घुसून गोळीबार व कोयत्याने वार !

Image
पंढरपूर नगर पालीकेचे नगरसेवक संदीप पवार यांच्यावर येथील स्टेशन रोड परिसरातील हॉटेल श्रीराम येथे ऐन गर्दीच्या वेळी चार ते पाच हल्लेखोरांनी गोळीबार व कोयत्याने वार करीत खुनी हल्ला केला आहे.या हल्ल्यात संदीप पवार हे गंभीर जख्मी झाले असून त्यांना तातडीने येथील ऍपेक्स रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यांची परिस्थीती आणखी गंभीर बनल्याने पुढील उपचारासाठी सोलापूर येथे पाठविण्यात आले आहे.            पोलीसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहीतीनुसार नगरसेवक संदीप पवार हे येथील हॉटेल श्रीराम येथे नेहमीच्या मित्रांबरोबर नेहमीच्या टेबलवर गप्पा मारीत चहा पीत असतानाच चेहर्‍यावर काळे कापड गुंडाळलेले चार पाच हल्लेखोर या हॉटेलात घुसले.आल्या आल्या त्यांनी थेट गोळीबार करुन संदीप पवार यांना जबर जख्मी केल्यानंतर पुन्हा सोबत आणलेल्या कोयत्याने वार केले.यावेळी संदीप पवार यांनी हॉटेलच्या बाहेर धाव घेण्याचा प्रयत्न केला मात्र हल्लेखोरांनी आणखी वार केल्याने ते जागेवरच कोसळले.        या घटनेनंतर पंढरपूरात पुन्हा भीतीचे वातरावरण निर्माण झाले आहे. रविवारी गुढी पाडवा ...

पंढरी वार्ता :- यमाई तलावातील मासेचोरी रोखण्यासाठी मासेमारीस परवानगी देणे गरजेचे ! बेकायदा मासेमारी रोखण्यासाठी शासनाच्या आदेशानुसार तीमाही मासेमारीस परवनागी शक्य.

Image
पंढरपूर शहरातील पर्यावरण प्रेमी तसेच आरोग्यप्रेमी नागरिकांच्या द्रष्टीने पंढरीचा रंकाळा तलाव म्हणजे यशवंतराव चव्हाण तलाव अर्थात यमाई ट्रॅक येथे गेल्या वर्षी वरूणराजाने कृपा केल्याने पाण्याची पातळी मोठया प्रमाणात वाढली होती.ऑक्टोंबर महिन्याततर या तलावाच्या सांडव्यातून पाणी बाहेर पडू लागले होते.सहा महिन्यानंतर तलावातील पाण्याची पातळी थोडीफार कमी झाली असली तरी आजही या तलावात मोठया प्रमाणात पाणी आहे.या पाण्यात विविध जलचर प्राणी सद्या आढळून येत असतानाच येथे मोठया प्रमाणात मासेही उपलब्ध असून येथे अधिकृतरित्या मासेमारीस परवानगी नसली तरी काही व्यक्तीनी अनधिकृत मासेमारीसाठी या तलावात मोठया प्रमाणात मत्सबीज सोडले होते.आता त्यांच्याकडून येथे स्वत: मासेमारी करण्याबरोबरच इतर मासेमारी करण्यांकडून मोठया प्रमाणात रकमा उकळल्या जात असल्याची चर्चा होत आहे.         यमाई तलावाच्या कामासाठी निधी उपलब्ध करुन देताना राज्यशासानाच्या पार्यवरण विभागाने अनेक अटी व शर्तीनुसार हा निधी नगर पालीकेस उपलब्ध करुन दिला आहे.त्यानुसार येथे कुठल्याही स्वरुपाचे स्थायी बांधकाम करावयाचे झाल्यास राज्य शासना...

पंढरी वार्ता :- तुंगत येथील पाणी टंचाईचा प्रश्‍न आणखी बिकट ! राष्ट्रवादी युवक कॉग्रेस आंदोलनाचा आंदोलनाचा इशारा

Image
पंढरपूर तालुक्यातील मोठया लोकसंख्येचे गाव असलेल्या तुंगत येथील ग्रामस्थांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून पाण्यासाठी घागरी घेवून दूरवर पायपीट करावी लागत आहे.येथील पाणी टंचाईमुळे दररोज टमटमसारख्या वाहनाद्वारे पाणी आणावे लागत असून दररोज दिडशे ते दोनशे विविध वाहने पाण्यासाठी फेर्‍या मारत असल्याचे दिसून येते.यासाठी ग्रामस्थांना मोठी किंमत मोजावी लागत असून पाणी वाहतूकीचा व्यवसाय जोरात सुुरु असल्याचे दिसून येते.     तुंगत येथील पाणी टंचाईच्या गंभीर प्रश्‍नामुळे सत्ता परिवर्तन झाले मात्र तोच प्रश्‍न आजही येथील जनतेसमोर आ वासून उभा आहे.पाणी टंचाईमुळे ऐन परिक्षेच्या कालावधीत विद्यार्थ्यांना अभ्यास सोडून पाणी आणण्यासाठी भटकावे लागत असून या गंभीर प्रश्‍नाची दखल सत्ताधारी दखल घेत नाहीत निदान प्रशासनाने तरी दखल घेवून तातडीने सुरळीत पाणी पुरवठयासाठी उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा राष्ट्रवादी कॉग्रेेसचे तालुकाध्यक्ष व ग्रा.प.सदस्य औदुंबर गायकवाड यांनी दिला आहे.

पंढरी वार्ता :- राष्ट्रवादी कॉग्रेेसच महिलांना आणि वंचीत घटकांना न्याय मिळवूण देवू शकते- चित्रा वाघ राष्ट्रवादी महिला कॉग्रेेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ यांचा पंढरीत सत्कार

Image
राष्ट्रवादी महिला कॉग्रेेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ यांचा पंढरपूर शहर राष्ट्रवादी कॉग्रेसच्या वतीने सत्कार करण्यात आला.यावेळी बोलताना चित्राताई वाघ म्हणाल्या की केंद्रात आणि राज्यात सत्तेवर असलेल्या या सरकारबद्दल सर्वसामान्य जनतेमध्ये प्रचंड नाराजी आहे.राष्ट्रवादी कॉग्रेसच खर्‍या अर्थाने समाजातील वंचीत घटकांना व महिलांना न्याय मिळवून देवू शकते याची पुन्हा एकदा खात्री जनतेला पटली आहे.यासाठी आता पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्षाची ध्येयधोरणे तळागाळात पोहचविण्यासाठी आणखी थोडे कष्ट घेतल्यास राज्यात पुन्हा राष्ट्रवादी कॉग्रेसची सत्ता येणार आहे.        यावेळी राष्ट्रवादी कॉग्रेेसच्या जिल्हा निरिक्षक निर्मलाताई बावीकर,जिल्हाध्यक्षा मंदाताई काळे,पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष दिपक वाडदेकर,शहराध्यक्ष सुधीर भोसले,सचिव विजय काळे,राष्ट्रवादी युवक कॉग्रेसचे शहराध्यक्ष संदीप मांडवे,ओबीसी सेलचे शहराध्यक्ष अनिल सप्ताळ,ओबीसी सेलचे कार्याध्यक्ष मनोज आदलींगे,युवक जिल्हा सरचिटणीस प्रशांत घोडके,दौलत शिंदे,युवराज भोसले यांच्यासह राष्ट्रवादीचे पद...

पंढरी वार्ता :- अनवली सबस्टेशन बंद असल्याने ‘बळीराजाचे’ महावितरणच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन ! तातडीने विज पुरवठा सुरु केल्यानंतरच आंदोलन स्थगीत

Image
पंढरपूर तालुक्यातील अनवली येथील महावितरणचे सबस्टेशन गेल्या सहा दिवसापासून बंद असल्याने या भागातील शेतकर्‍यांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत होती.तर पाण्याअभावी जनावरांचेही हाल होत होते. ग्रामिण भागातील वीजबीलाची सक्तीने वसुली करण्यासाठी महावितरणच्या अधिकार्‍यांनी थेट अनवली येथील सबस्टेशन बंद करुन वसुली सुुरु केली होती.यामुळे या परिसरातील अनेका गावांचा विद्युत पुरवठा बंद झाल्याने ग्रामिण जनतेस मोठा त्रास सहन करावा लागत होता.जनतेच्या संतप्त भावनांची दखल घेत बळीराजा शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी व शेतकर्‍यांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता नंदकुमार सोनंदकर यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले व जो पर्यंत अनवली सबस्टेशनचा विजपुरवठा सुरु केला जात नाही तो पर्यंत आम्ही इथून हालणार नाही असा इशारा बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माऊली हळणवर यांनी दिला.            बळीराजा शेतकरी संघटनेच्या उपस्थित पदाधिकार्‍यांचा व अनवली सबस्टेशन बंद असल्याने संतप्त झालेल्या शेतकर्‍यांचा दबावानंतर अखेर वीज पुरवठा सुरळीत सुुरु करण्यात आला.      ...

कर्तृत्वान महिला समाजाचा आदर्श- चित्रा वाघ शरद प्रतिष्ठानचे पुरस्कार वितरीत

Image
 संसाराचा गाडा सांभाळत असताना आपल्या मुलांवर चांगले संस्कार करून त्यांना घडविणारी माता ही खर्‍या अर्थाने समाजासाठी आदर्श असल्याचे गौरवोद्गगार राष्ट्रवादी महिला कॉंगेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी काढले आहेत.येथील शरद कीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने जिल्ह्यातील पाच कतृर्त्ववान मातांचा शारदाई पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.या कार्यक्रमाच्या निमित्ताने नगरपालिकेच महिला सफाई कामगारंचा देखील साडी चोळी देऊन सन्मान करण्यात आला.  यावेळी वैशाली गुंड, मंदा काळे, निर्मला बावीकर, शरद प्रतिष्ठानचे संस्थापक लक्ष्मीकांत खाबिया यांच्यासह राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुधीर भोसले,दीपक वाडदेकर,संदीप मांडवे,शरद प्रतिष्ठानचे जिल्हाध्क्ष श्रीकांत शिंदे, शहराध्यक्ष राजन जगताप आदी उपस्थित होते. या वेळी वीरमाता वृंदा गोसावी, विमल घोलप, सुमन नेहतराव, कुसुम कसगावडे व सुवर्णा कुलकर्णी या पाच मातांचा शारदाई पुरस्काराने गौरव करण्यात आला. तसेच नगरसेविका श्‍वेता डोंबे, प्रा.विद्युलता पांढरे,डॉ.दिपश्री घाडगे,श्रीमती पाचंगे,ऍड.विनय गिराम,ऍड.नेत्रजा पाटील,महिला पोलीस लोंढे व नगराळे, निर्भा पथकामध...

पंढरी वार्ता:- शहीद कुणाल गोसावी जयंतीचे औचित्य साधत पंढरीत 19 मार्च रोजी डि.व्ही.पी.मार्टचा शुभारंभ

Image
डि.व्ही.पाटील ग्रुपच्या माध्यमातून विविध उद्योग व्यवसायात नेत्रदिपक प्रगती साधून युवा उद्योजकांचे आयकॉन ठरलेल्या अभिजीत पाटील,अमर पाटील,श्रीकांत बोरगावकर,श्रीनिवास बोरगावकर या युवा उद्योजकांनी डि.व्ही.पी.स्क्वेअर नंतर आता डि.व्ही.पी.मार्ट या नव्या व्यवसायात पदार्पण केले असून शहीद मेजर कुणाल गोसावी यांच्या जयंतीचे औचित्य साधून वीरमाता-पिता वृंदागीर मुन्नागीर गोसावी व वीरपत्नी उमा कुणालगीर गोसावी यांच्या शुभहस्ते सोमवार दिनांक 19 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजता डि.व्ही.मार्ट चा शुभारंभ होणार आहे.        डि.व्ही.पी.स्क्वेअर या मल्टीफ्लेक्सच्या भव्य संकुलाच्या तळमजल्यावर डि.व्ही.पी.मार्ट साकारण्यात आले असून ग्राहकांना एकाच छताखाली ग्राहपयोगी व जिवनावश्यक वस्तुंची माफक दरात व विविध सवलतीचा लाभ घेत खरेदी करता येणार आहे.याच बरोबर या ठिकाणी गेम झोन विभाग,फुडकोर्ट व प्रत्येक दिवशी नविन आकर्षक डिस्काउंटची ऑफरही ग्राहकांना उपलब्ध राहणार आहे.    पंढरपूर शहराच्या वैभवात विविध नाविन्यपुर्ण व्यवसाय आणि उद्योगाच्या माध्यमातून डि.व्ही.पी.ग्रुपने भर घातली असून त्याच बरोबर अने...

पंढरी वार्ता :- बेकायदा विटभट्टयांचा विषय थेट विधानसभेच्या पटलावर ! आ.भारत भालकेंनी उपस्थित केला मंगळवेढा तालुक्यातील बेकायदा वीटभट्टयाबाबत प्रश्‍न !

Image
महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रक मंडळाकडून नाहरकत प्रमाणपत्र व तहसील कार्यालयाकडून परवानगी नसताना शहर  परिसर व शहरास जोडणार्‍या प्रत्येक प्रमुख रस्त्यावर अनेक वीटभट्ट्या सुरू असल्याचे वेळोवेळी निदर्शनास आले आहेे.वीट भाजण्यासाठी दगडी कोळसा वापरला जातो. यामुळे सल्फर डायऑक्साइड, कार्बन डायऑक्साइड, कार्बन मोनोऑक्साइड, आणि नायट्रोजन मधील ऑक्साइड या विषारी वायूंचे उत्सर्जन होते. सल्फर डायऑक्साइडमुळे डोळ्याचे विविध विकार आणि हवेतील नायट्रोजनमधील डायऑक्साइडमुळे फुफ्फुसाचे व त्वचेचे आजार होतात. कार्बन मोनोऑक्साइड आणि कार्बन डायऑक्साइड या विषारी वायुमुळे वीटभट्याच्या परिसरातील तापमान वाढून आरोग्यावर विपरीत परिणाम होतो.या कारणांमुळे प्रदूषण नियंत्रक मंडळाने वीटभट्टी सुरू करण्या संदर्भातील कडक नियम केले आहेत.    विनापरवाना वीटभट्यांवर प्रतिबंध घालून कारवाई करणे प्रत्येक तालुक्याच्या तहसील कार्यालयाकडून अपेक्षित आहे. मात्र याचे गांभीर्य नसल्याने वीटभट्या बेकायदा सुरू असल्याचे अनेक ठिकाणी आढळून येते.गेल्या अनेक वर्षापासून नदीकाठावर मोठ्या प्रमाणात माती उत्खनन करून वीटभट्टीसाठी माती ...

पंढरी वार्ता :- शिक्षण हक्क कायद्या अर्तंगत प्रवेश प्रकियेत पहील्या टप्प्यात जिल्ह्यातील 3697 पेकी केवळ 35 विद्यार्थ्यांना प्रवेश ! पंढरपूर शहर व तालुक्यातील 20 विद्यार्थ्यांचा समावेश

Image
शिक्षण हक्क कायद्यानुसार अर्थिक द्रष्टया दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शाळा प्रवेशासाठी शासनाकडून ऑनलाईन प्रक्रिया राबविण्यात येत असून या अर्तंगत सोलापूर जिल्ह्यात 3697 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार असून मंगळवारी लॉटरी पध्दतीने सोडत प्रस्तावित करण्यात आली होती.त्यानंतर आजतागायत जिल्हयात केवळ 35 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आल्याची माहीती शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे.ही प्रवेश प्रक्रिया राबविताना शाळेची प्रवेश क्षमता जास्त असेल आणि शाळेकडे कमी प्रवेशपात्र अर्ज आले असतील तर शाळा सर्व प्रवेशअर्जांना मान्यता देण्यात येणार आहे.तर शाळेकडे (शाळेची) प्रवेश क्षमता कमी असेल तर जिल्ह्याचे प्राथमिक शिक्षण अधिकारी यांच्या द्वारा लॉटरी पद्धतीने ड्रॉ काढून या शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया राबविणार आहेत. या लॉटरी सोडतीनंतर पालकांकडून आवश्यक व योग्य अशा सर्व गोष्टींची पूर्तता करून मगच शाळा विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्‍चित करण्यात येणार आहे.पंढरपूर अर्तंगत इयत्ता पहीलीसाठी 438 जागा उपलब्ध असून त्यापैकी 39 प्रवेश निश्‍चित झाले आहेत.तर पुर्वप्राथमिकसाठी 23 जागा उपलब्ध असून अजुन एक...